Ad will apear here
Next
‘द मोदी इयर्स’ पुस्तकाचे प्रकाशन

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणाऱ्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या ‘द मोदी इयर्स’ या पुस्तकाचे नुकतेच येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या पुस्तकाचे संपादक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते.

नामवंतांचे लेख, दर्जेदार छपाई, मोदींची दुर्मिळ छायाचित्रे, अद्ययावत आकडेवारी आणि मोदींच्या व्यक्तीमत्वातली मानवी बाजू दाखवणारे असे हे पुस्तक आहे. दोनशे पानांच्या या पुस्तकात शंभर पाने रंगीत असून, पुस्तकात एकही जाहिरात नाही. पुस्तकाला २०१९ची डायरी जोडलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक वर्षभर वाचकांच्या, कार्यकर्त्यांच्या हातात राहील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नकवी, खासदार मीनाक्षी लेखी, लेफ्ट. जन. निंभोरकर, शहजाद पुनावाला, उद्योगपती राम भोगले, डॉ. सुरेश हावरे, शैलेंद्र देवळाणकर, मेजर गौरव आर्य, सुनील साठे, माधव भांडारी, विजया रहाटकर, हनुमंत गायकवाड अशा १६ नामवंतांचे नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, उज्ज्वला गॅस योजना, तीन तलाक, जी. एस. टी., स्वच्छ भारत, जन धन योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर लेख आहेत. या पुस्तकाची संकल्पना आणि संपादन भगवान दातार यांचे असून, इमेज मीडियाने ते प्रकाशित केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZURBX
Similar Posts
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी सोलापूर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या एक हजार कोटींच्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, नऊ जानेवारी रोजी सोलापूर येथे जाहीर सभेत केली.
पुन्हा मजबूत सरकारचा ‘भाजप-सेना’ युतीचा निर्धार नागपूर : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार शुक्रवारी नागपूर येथे भारतीय जनता पक्ष–शिवसेना युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.
‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट) व्यक्त केली
‘भाजप सरकार भेदभाव न करता जनतेची सेवा करेल’ मुंबई : ‘केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आपण आभारी आहोत. मोदींच्या सूचनेनुसार भाजपचे सरकार कोणताही भेदभाव न करता पारदर्शीपणे जनतेची सेवा करेल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language